Rain in Maharashtra : मान्सून बाबत हवामान खात्याची मोठी माहिती समोर, या तारखेला राज्यात होणार आगमन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain in Maharashtra : गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसा चा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना मे महिन्यामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये हाल सोसावे लागत आहेत. त्याच मध्ये अचानक होत असलेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याकडून मान्सून बाबत मोठी माहिती देण्यात आलेली आहे. मान्सून राज्यांमध्ये कधी दाखल होणार याची माहिती नागरिकांसह शेतकऱ्यांना असणे खूप महत्त्वाचे आहे. हवामान विभागाने दिलेला अंदाज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Rain in Maharashtra

रेशन कार्डची नवीन यादी जाहीर! फक्त याच लोकांना मिळणार रेशन,15 मे पासून नवीन नियम लागू, यादीत नाव पहा

गेल्या दोन-चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्याचा आणि अचानक आलेला पावसाचा मोठा तडाका बसला आहे. ठाणे, मुंबई उपनगर, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरामध्ये वादळ वारसा जोरदार पाऊस पडला आहे. त्यानंतर आता मान्सून कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे.

SBI बँकेत खाते असेल तर तुम्हाला देखील मिळतील महिन्याला 24 हजार रुपये

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात येणाऱ्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 19 मे च्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार या बेटा परिसरामध्ये दाखल होऊ शकतो. व त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे मान्सून भारतामधील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेले केरळ मध्ये प्रवेश करणार आहेत. भारतीय हवामान खात्याकडून अध्याप मान्सूनच्या किरणमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु सध्या वातावरणाचा नूर पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये देशात आणि राज्यांमध्ये मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे सध्या दिसू लागली आहेत.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या वाटचालीस कोणतीही अडथळी न आल्यास केरळमध्ये एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होऊ शकतो. तसेच महाराष्ट्रामध्ये आठ जूनच्या आसपास सक्रिय होऊ शकतो. गेल्या वर्षी मान्सून 16 जूनला दाखल झाला होता. परंतु यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनो, फक्त हा फॉर्म भरा; सरकार देत आहे कमी व्याजदर मध्ये कर्ज

अनेक भागांमध्ये दमट वातावरण निर्माण झाले असल्याने मान्सून कधी येणार याची आशा आता सर्वांनाच लागलेली आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. त्यांच्या दृष्टीने हा येणारा मान्सून कसा असणार आता याच्याकडे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

1 thought on “Rain in Maharashtra : मान्सून बाबत हवामान खात्याची मोठी माहिती समोर, या तारखेला राज्यात होणार आगमन”

Leave a Comment