Water storage: नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला माहीतच असेल, की सध्या उन्हाळा हा ऋतू सुरू आहे. व उन्हाळ्यामध्ये चैत्र महिना आणि या महिन्यांमध्ये फारच कडाक्याचे ऊन हे पडत असतात. व दिवसेंदिवशी यामध्ये पाण्याचा साठा देखील कमी होत आहे.
उन्हाळा म्हटले की, सर्वत्र ठिकाणी या पाण्याची टंचाई हे भासत असते, व शेतातील जनावरांसाठी लागणारे पाणी सुद्धा रोजच्या वापरातील लागणारे पाणी व पिण्यासाठी लागणारे पाणी हे देखील आता कमी होऊ लागलेले दिसत आहे.
हे पण वाचा,राज्यामध्ये प्रचंड पाऊस व गारपिटीचे थैमान; ”पंजाबराव डखांनी” याबाबतची दिली स्पष्टपणे माहिती..!
तर यासाठी ग्रामीण भागातील लोकांना अनेक जागोजागी जाऊन पाणी हे पिण्यासाठी आणावे लागत आहे. केंद्रीय भूजल मंडळाणे व महाराष्ट्र राज्यातील भूजल साठ्याची आकडेवारी ही आता वार्षिक अहवालानुसार जाहीर केलेली आहे.
या 2023 मध्ये राज्यामधील पडलेला पाऊस व त्यामधून जमिनीमध्ये जिरलेले पाणी व त्यातून वर्षभरामध्ये झालेला या पाण्याचा वापर व भविष्यकाळासाठी वापरण्यायोग्य उरलेले जलसाठे हे या अहवालामध्ये नमूद केलेले आहेत.Water storage:
तर, या चैत्र महिन्यामध्ये म्हणजेच, अति तीव्र उन्हाळ्यामधील कोणत्या जिल्ह्यामधील किती प्रकारचा जलसाठा आहे, ते यामध्ये स्पष्ट केलेले आहे. व तसेच या जलसाठ्यामध्ये किती टक्के पाणी शिल्लक आहे, व किती टक्के पाणी हे वापरण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती यामध्ये दिलेली आहे.
मागील वर्षाचा पाऊस व या वर्षाची भूजल साठ्याची स्थिती
32 कोटी क्युबिक मीटर व जल पुनर्बन हे झाले तर 16 कोटी क्युबिक मीटर या पाण्याचा उपसा झालेला आहे. आणि आता 14 कोटी क्युबिक मीटर पाणी या जमिनीमध्ये शिल्लक आहे. व 2 कोटी क्युबिक मीटर पाण्याची वाफ ही तयार झाल्याचे अहवालामधून दिसून आले आहे.
तर पहा, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पाणीसाठा हा शिल्लक राहिलेला आहे?
अमरावती या जिल्ह्यामध्ये 91.83 उपसा, तर 8.17 टक्के शिल्लक साठा,
अहमदनगर या जिल्ह्यामध्ये 79.20 उपसा, तर 20. 80 टक्के शिल्लक साठा,
जळगाव या जिल्ह्यामध्ये 78.76 उपसा, तर 21.24% शिल्लक साठा,
सोलापूर या जिल्ह्यामध्ये 77.54 उपसा, 22.46% शिल्लक साठा,
बुलढाणा या जिल्ह्यामध्ये 76.95 उपसा, तर 23.05% शिल्लक साठा,
छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये 71.64 उपसा, तर 28.36% शिल्लक साठा,
पुणे या जिल्ह्यामध्ये 69.65 उपसा, तर 30.35 टक्के शिल्लक साठा,
अकोला या जिल्ह्यामध्ये 65.59 उपसा, तर 34.41% शिल्लक साठा,
सातारा या जिल्ह्यांमध्ये 37.89 उपसा, तर 62.11% शिल्लक साठा,
धाराशिव या जिल्ह्यांमध्ये 62.01 उपसा, तर 37.99% शिल्लक साठा,
वाशिम या जिल्ह्यामध्ये 60.20 उपसा, तर 39.80% शिल्लक साठा,
बीड या जिल्ह्यामध्ये 59.22 उपसा, तर 40.78% शिल्लक साठा,
नाशिक या जिल्ह्यामध्ये 58.41 उपसा, तर 41.59% शिल्लक साठा,
लातूर या जिल्ह्यामध्ये 54.88 उपसा, तर 45.12% शिल्लक साठा,
जालना या जिल्ह्यामध्ये 54.85 उपसा, तर 45.15% शिल्लक साठा,
सांगली या जिल्ह्यामध्ये 54.19 उपसा, तर 45. 81% शिल्लक साठा,
वर्धा या जिल्ह्यामध्ये 53.55 उपसा, तर 46.45% शिल्लक साठा,
धुळे या जिल्ह्यामध्ये 51.77 उपसा, तर 48.23% शिल्लक साठा,
तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पाण्याचा साठा हा शिल्लक राहिलेला आहे याबाबतची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.
1 thought on “जाणून घ्या; कोणत्या जिल्ह्याचा पाणीसाठा किती टक्के शिल्लक राहिलेला आहे..!”