Onion Market: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक शेतकरी हे आपल्या शेतामध्ये कांद्याचे पीक घेत असतात, पण अशातच या कांद्याला भाव हा किती भेटला? व कोणत्या जिल्ह्यामध्ये हा भाव सर्वात जास्त भेटत आहे? हे अनेक शेतकऱ्यांना माहीतच असेल. पण अशातच, काही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणावर कांद्याला भाव भेटलेला आहे. तर जाणून घ्या या कांद्याचा भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे.
केंद्र सरकारने या कांदा निर्यात बंदी उठवण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. व त्यानंतर शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वाधिक 3 हजार 300 रुपये प्रति क्विंटर प्रमाणे भाव हा कांद्याला भेटलेला आहे. आणि त्याच पाठोपाठ लासलगावा मध्ये 2700 रुपयांचा भाव मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
हे पण वाचा, नवीन 224 महसूल मंडलामध्ये, झाल दुष्काळी स्थिती जाहीर !
आणि त्याच प्रमाणे गेल्या मागील काही दिवसांमध्ये कांदा निर्यात बंदीमुळे भावामध्ये फारच मोठी घसरण झालेली होती. आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सुमारे 800 ते 900 ट्रक कांद्याची आवक एवढी होती. पण भाव 1000 ते 1500 रुपयांपर्यंतच भेटत होता. Onion Market:
म्हणून शेतकरी हे हवालदिल झालेले होते. गेल्या आठवड्यामध्ये कांद्याची आवक ही कमी झालेली आहे. आणि शनिवारी 428 ट्रक एवढी कांद्याची आवक होती. भाव 2100 पर्यंत भेटत होता. आणि सरासरी भाव हा 1100 रुपये ऐवढा मिळत होता.
कोसळलेला भाव हा आता हळूहळू वाढत आहे. पण दरम्यान रविवारच्या दिवशी कांद्या निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय हा तर झालेला आहे. त्यामुळे आता कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा निर्माण ही शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे. आणि सोमवारी शिवजयंती निमित्त लिलाव हा बंद पडला होता.
व रविवारच्या दिवशी आणि सोमवारी बंद असल्याने मंगळवारी मोठी आवक होईल असे वाटत होते. पण मात्र, कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाला की नाही, याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मालच हा आणला नाही. म्हणून आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे.
यामध्ये, केवळ 78 एवढ्या ट्रक कांद्याची आवक होती.
आवक ही कमी असल्यामुळे भावामध्ये मोठी वाढ झालीच नाही. आणि शनिवारी 2000 रुपयाला विकलेल्या कांद्याला मंगळवारी 3300 रुपयांचा भाव मिळाला. आणि यामध्ये सरासरी भावातही वाढ ही झाली असून, 1900 रुपये भाव भेटल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. आणि आवक ही कमी जरी असली, तरी भाव हा चांगला भेटल्याने 1 कोटी 48 लाख रुपयांची उलाढाल ही झाली आहे.
दत्तात्रय सूर्यवंशी, सचिव, सोलापूर बाजार समिती यांच्या माहितीस्तव !
कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये भावात मोठी वाढ झाली आहे. पण मात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रमअवस्था ही असल्यामुळे आवक सुद्धा कमी होती. पण शुक्रवारपासून आवक वाढण्याची फार दाट शक्यता आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन भाव वाढण्याची शक्यता ही आता नाकारण्यात येत नाही.
डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये कांद्याला भाव मिळाला, तेव्हाच कांद्याची आवक ही मोठी होती. पण आता आवक कमी झाल्यामुळे सध्या कमी शेतकऱ्यांकडे हा कांदा शिल्लक राहिलेला आहे.
आणि त्यामुळे यापूर्वीच निर्यातबंदी ही उठवली असती तर अशा शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असता. दोन महिन्यांमध्ये विक्री केलेल्या कांद्याला अनुदान हे अजून देऊन सहकार्य करावे. शिवपुत्र बिराजदार, शेतकरी यांनी स्पष्ट केलेले आहे.
1 thought on “कांद्याची आवक घटली; या जिल्ह्यांमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव!”