वातावरणात मोठा बदल; पावसामुळे पुढचे काही दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. खरंतर अनेक दिवसापासून राज्यातील काही भागात अति मुसळधार पाऊस पडत आहे. नुसता पाऊसच नाही तर वादळी वारा आणि अतिवृष्टी सारखा पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Maharashtra Havaman Andaj

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र या भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. या ठिकाणी नागपूर अमरावती मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

तसेच भारतीय हवामान खात्याने नुकताच पुढील येत्या चार दिवसांमध्ये अनेक भागात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तर हाच अंदाज आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या भागात होणार मुसळधार पाऊस

आयएमडीने दिलेल्या अंदाजामध्ये आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर कोकण, पालघर मध्य महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने विदर्भामध्ये भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच भारतीय हवामान खात्याने विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाची बॅटिंग पाहायला मिळणार आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्यांवर दिलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच या भागात रेड अलर्ट दिलेला आहे. तसेच उद्या दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

तसेच विदर्भातील सर्वच 11 जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिलेला आहे.

तसेच या पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या पावसाचा दिलासा मिळणार आहे.

6 thoughts on “वातावरणात मोठा बदल; पावसामुळे पुढचे काही दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी”

Leave a Comment