लोकसभा निवडणुकीची घोषणा महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका या, तारखेला होणार मतदान ..?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lok Sabha Election Date Announced : आज शनिवारी लोकसभा निवडणूक साठी आचारसंहिता जाहीर झाले आहेत. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली आहे.

निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद बोलून लोकसभा निवडणूक जाहीर केली आहे व निवडणुकांची घोषणा केली आहे. पाच टप्प्यात महाराष्ट्र मध्ये होणार मतदान जाणून घ्या संपूर्ण माहिती. खाली प्रमाणे असणार पाच टप्प्यात निवडणुका. Lok Sabha Election Date Announced

पहिला टप्पा :- दिनांक 19 एप्रिल वार शुक्रवार- नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया ,गडचिरोली -चिमूर ,चंद्रपूर

दुसरा टप्पा :- दिनांक 26 एप्रिल वार शुक्रवार – बुलढाणा , अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ ,वाशिम ,हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा :- दिनांक 7 मे वार मंगळवार , – रायगड, बारामती ,धाराशिव ,लातूर, सोलापूर ,माढा ,सांगली ,सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ,हातकणंगले

चौथा टप्पा :- दिनांक 13 मे वार सोमवार ,- नंदुरबार ,जळगाव ,रावेर ,जालना ,छत्रपती संभाजीनगर, मावळ ,पुणे ,शिरूर ,अहमदनगर ,शिर्डी ,बीड

पाचवा टप्पा :- दिनांक 20 मे वार सोमवार ,- धुळे ,दिंडोरी, नाशिक, पालघर ,भिवंडी ,कल्याण ,ठाणे ,दक्षिण मुंबई ,दक्षिण मध्य मुंबई ,ईशान्य मुंबई ,उत्तर मुंबई ,उत्तर मध्य मुंबई ,उत्तर पश्चिम मुंबई

पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले की 16 जून 2024 रोजी लोकसभेच्या कार्यकाळ संपत आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेच्या कार्यकाळ संपत आहे तिथेही निवडणुका घेण्यात येणार आहेत.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली माहिती :- 10.5 लाख पुलिंग बूथ असून 97 कोटी पेक्षा जास्त मतदार आहेत. 54 लाख पेक्षा जास्त मशीनद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार आहे यासाठी दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत असे व्यक्त निवडणूक आयुक्तांनी केले आहे.

महत्वपूर्ण मुद्दे :

1 . यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी 1.82 कोटी नव मतदार असणार आहेत.

  1. 48 हजार तृतीयपंथी मतदार असणार आहेत
  2. शंभर वर्षे वरील मतदारांची संख्या दोन लाख
  3. 49.7 कोटी पुरुष मतदार
  4. 47.1 कोटी महिला मतदार
  5. 18 ते 21 वयोगटातील २१.५० कोटी मतदार
  6. महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषापेक्षा जास्त आहे.

पैसा व बळाचा वापर न व्हावा म्हणून कठोर निर्देश घेण्यात आले आहे :

मुख्य निवडणूक आयुक्त राजकुमार यांनी असे सांगितले की मनी पावर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पाऊल उचलण्यात आले आहेत . जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना देण्यात आले आहेत . व त्यांनी सांगितले की मागील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पैसा आणि बाळाचा वापर झाल्याचं आमच्या निर्देशात आले होते त्यामुळे आता सगळ्या हिंस आणि पैशाचा गैरवापर आम्ही होऊ देणार नाहीत.

हे पण वाचा : या योजनेअंतर्गत मिळणार मोफत गॅस सिलेंडर…! कोणती आहे योजना.?

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “लोकसभा निवडणुकीची घोषणा महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका या, तारखेला होणार मतदान ..?”

Leave a Comment